Saturday, June 13, 2009

रोता सूरज, जलता सूरज

कोण ते टिळक, गांधी, नेहरू, आझाद, पटेल, आंबेडकर?
आम्हाला स्वातंत्र्य दिलं, आम्हाला लोकशाही दिली
"अरेरे साहेब गेला! तो होता तेच भलं होतं" असं आम्ही चारचौघात म्हणू शकतो इतपतच काय ती आमची लोकशाही-
आम्ही काय मनात येईल ते बोलू शकतो. आणि काहीही न करता बसू शकतो. आणि का नाही? आम्ही रामायणं लिहीत नाही नुसती तर ती घडवतो महाराजा.
बाकी चोर्‍यामार्‍यापुरते आम्ही वाल्याचे वारस.
वाल्मिकी व्हायची वेळ येते तेव्हा मात्र आम्ही परंपरेशी नाळ तोडून
आधुनिक म्हणवायला मोकळे- शेपट्या उडवत. कोणाच्या शेपट्या? थांबा थांबा बोलू नका. लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील. आजकाल शेपट्यांच्याही वाटण्य़ा झाल्यात. मालकासमोर हालवता झुलवता येत नसतील तर मग नुसत्याच पायात घाला. उरल्याच का तरीही? मग छाटून टाका.

आम्ही खुश होतो. का तर मिलीजुली सरकार... जरा एकमेकांचा वचक राहील. एकाची सद्दी नको बुवा. का? तर म्हणे मागचा अनुभव बरा नव्हता. दगडापेक्षा वीट मऊ. आता आम्ही खुश येवढ्यासाठीच की एकसंध सरकार आलं. तुकड्या तुकड्याचं नको. पायात पाय अडकून तोंडघाशी पडणं नको. का? तर म्हणे मागचा अनुभव बरा नव्हता. दगडापेक्षा वीट मऊ.
पण कुठला अनुभव कधी बरा होता? सांगा ना?
कोण दगड? कोण वीट? सांगा ना?
शेवटी आपल्या हाती काय- दगड आणि विटा!
कोणीतरी आपल्या डोळ्यात धूळफेक करायची
आणि मग आम्ही मोकळे एकमेकांवर दगडफेक करायला
तुमचा पक्ष कोणता? तुमचा गट कोणता?
तुमचा कोण? राम, नानक, बुद्ध, अल्ला की येशू?
का या यादीत नसलेले किंवा असलेले कोणी?
आम्ही बुवा शिकलेले.
गट नसलेल्यांच्या गटातले, धर्म नसलेल्यांच्या धर्मातले
आमचा कशाशीच संबंध नाही. आम्ही तटस्थ.
नेरोनी रोममधे माणसं जाळली जिवंत तेव्हा आम्ही तटस्थ होतो
डायरचं जालियनवाला झालं तेव्हाही आम्ही तटस्थ होतो
आणि अशा कित्येक घटना घडून गेल्या मधे
आणि आता कित्येक घडताहेत प्रत्येक दिवशी पण आम्ही तटस्थ
काहीच कसं करत नाही म्हणता?
आम्ही बोलतो ना- संयमाने, संतापाने, पोटतिडकीने
आम्ही लिहीतो ना असं काही तरी- गुळमुळीत, खुसखुशीत आणि जळजळीतही
आणि स्वप्न बघतो हे सगळं बदलण्याची
कायदा आहे ना हे सगळं बदलायला.....

कायदा समाज व्यवस्था बदलू शकत नाही
कारण कायद्याला पळवाटा असतात.
कायदा फक्त समाजव्यवस्था राखत असतो.
त्यामुळे समाज व्यवस्थेमधे जे शिखरावर त्यांच्या हाती कायदा, ते म्हणतील तो कायदा. चाबूक गाडीवाल्याच्या हातात द्या नाहीतर बैलांच्या वळ उठायचे ते उठणारच. कारण ज्याच्या हातात चाबूक तो दिशा ठरवणार. सोय इतकीच की त्यातल्या त्यात आलटून पालटून मार खा आणि दिशा बदलत दिशाहीन वाटचाल करत रहा. त्यातच आम्हाला लोकशाहीचे सार्थक झाल्याचे समाधान
***

सूरजको भी रोते हुए यहाँ हमनें देखा है ।
पहली किरण की मौत होते यहा हमनें देखा है ।।
चांदनीसे झुलस गयी रात कितनी काली है ।
चंदा के माथेपर किसने लिखी हुई एक गाली है ॥१
आधा खाया आधा छोडा बरगद अकेला खडा है ।
भूखा प्यासा काला बादल पत्थर होके पडा है ।।
मधुशालाके बाहर सुस्ताया काला जहरीला सपना है ।
जिसने अपना खून पिया वह समय भी तो अपना है ।।२
लंगडी, अंधी, काली बिल्ली रास्ता रोके खडी है ।
मंदिरसे निकली बूढी चुडैल दीवारोंपर चढी है ।।
रोशनीमे टंगी परछाई सायेसे भी डरती है ।
नसीब बुननेवाली मकडी जाल में फसकर मरती है ।।३
भीष्म-द्रोण की मुंडी काटे दुर्योधन सब झूम रहे हैं ।
दधीचि की हड्डी लेकर पागल कुत्ते घूम रहे हैं ।।
कुरुक्षेत्रका वस्त्र माँगकर सूतपुत्र पछताया है ।
पांचजन्यकी राह देखकर रण में अर्जुन सोया है ।।४

पलकें जलकर राख हो गयी
पडा हुआ था लकडी बनकर ।।
आएगा आएगा गिरिधर
नवजीवन की वर्षा लेकर ।।५

क्षितीज किनारे आँखे डाले कितने ही युग बैठा था ।
बैठा था; बैठा ही रहा, बैठा ही रहा, बैठा ही रहा, बैठा ही रहा, बैठा ही रहा.........

.

6 comments:

Paanthastha said...

va masta lihilay. Chhaan. Pan aplya paiki kiti loka asa vichar manat anatat kahi mahit nahi. tumchya aala ani tumchya kadun mala milala mhanun dhanyavad.

Saee said...

Khup sundar. Indeed the danger of being able to analyze situations is at some point you just turn into this keyboard that types away opinions in oblivion. And I think that is why people who have uncontrollable anger or emotion in them often become agents of change than people who spend half their lives trying to analyze what is wrong! Even Mahatma Gandhi used to be blinded by extreme anger before he transformed himself into who he was. I really liked it. One of the paragraphs reminded me of this quote I read a few days ago.

"Neutrality helps the oppressor, never the victim. Silence encourages the tormentor, never the tormented". -Elie Wiesel, writer, Nobel laureate (b. 1928)

-Cheers
Saee

Shibika said...

Was thinking on same lines yesterday nite..Your thoughts reminded me of a very simple but profoundly deep thoughts on democracy which I feel from heart..
" Democracy is not merely a form of government.It is primarily a mode of associated living of conjoint communicated experiece.It is essentially an attitude of respect and reverence towards fellowmen"

Tuzyakadun ya vishayawar vachun awadle..

Makarand MK said...

हे कोणत्या वेळी (कशामुळे) सुचलं तुला ?
हिंदी कविता "काला बंदर" च्या धाटणीची वाटत्ये!
छान!
माझ्या एका मित्रानेही काला बंदर हीच कविता पुढे वाढवली आहे:
http://vedhaspandit.blogspot.com/2009/04/my-lyrical-additions.html
असो. विचार आवडले.

Shubhangee said...

राधेला सोडून निघालेला कृष्ण इकडे येईल तोवर हि अशीच फरफट होणार का?
शिशुपालासारखे शंभर् अपराध भरण्याची वाट पाहतोय की काय?

शुभा मावशी

Hemangj said...

Fantastic