Friday, April 18, 2008

कांक्रीट पोएट्री

रविंद्रनाथ म्हणतात "artists are angles of surplus".
भाषा ही माणसाची गरज होती- संवाद साधण्यासाठी. खाणाखूणा पुरेनाशा झाल्या. तू तू मी मी पासून ते वाद, संवाद, विवाद, प्रतिवादापर्यंत अनेक शब्द बनले. प्रत्येक काळात प्रत्येक समाजात काही मंडळी असतात ज्याला त्याला शिस्त लावणारी. अशांनी मग व्याकरण बनवले. भाषा वाहती झाली समाज संवादी झाला. angles of surplus शब्दांच्या महिरपी बांधू लागले आणि कवितेचा जन्म झाला. शिस्तीचे पुरस्कर्ते तिथेही पुढे सरसावले. कविता व्रुत्तबद्ध झाली. तिच्यात सूर मिसळले आणि गाणं पालवलं. प्रथम फक्त तीन सूर नि, सा, रे. सिंधूच्या तीरी वेदरूचांचे गायन सुरू झाले. ते गंगेपाशी येई येई तो तिच्यात अजून दोन सूर मिळाले. कविता गाती झाली.

मंदाक्रांता, मंदारमाला, शार्दूलविक्रीडीत, प्रुथ्वी, भुजंगप्रयात, दिंडी, ओवी अशी अनेकविध व्रुत्तालंकारांनी सजलेली लेकुरवाळी कविता एकोणीसावं शतक येता येता पुन्हा एकदा गर्भार राहीली. ते अवघडले पण अंगोपांगी वागवत ती प्रसवेच्या वेदनेपर्यंत आली आणि मुक्तछंद - पुन्हा कविता ओघवती झाली. पण हा शिस्तभंग तिथेच थांबला नाही. नविन जमानाच समाधानी राहीला नव्हता. 'deconstruction' ची लाट आली. नियम बदलले, नियम मोडले गेले. भटाची शेंडी वरवंट्याला अन वड्याचं तेल वांग्यावर असे सगळे प्रयोग करून झाले.
कवितेचं यमक का जुळावं?
कवितेत गण, मात्रा का असाव्यात?
कवितेवर अर्थ वाहण्याची सक्ती का?
कोणी सांगितलं कवितेत शब्द असावेत?

मग चित्रांची कविता (visual poetry), आवाजाची कविता (sound poetry) अशाही विवीध रूपात कविता समोर आली. या उंच टाचांच्या चपला घालून, शरीराच्या नेमक्या वळणांपाशी तंग होणारा पोशाख केलेल्या या कवितेने बर्याच नजरांचा ताबा घेतला. तिला लोकांनी नाव दिलं 'concrete poetry'

4 comments:

मंदार said...

अरे तु किंवा पामर मराठे, ट्युलिप अशा दिग्गजांचे ब्लॉग वाचून काही लिहावं असं वाटतं.. अरे ऋ Ru असा लिहायचा बाराहा मध्ये...

prasad bokil said...
This comment has been removed by the author.
Suresh said...

What font did u use? Is it palationo for the large type face

कोहम said...

jabari